गुरुवार, १ मे, २०१४

अर्धवट स्वप्नांचा प्रवास

स्वतःच्याच व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू कळायला योग्य वेळ यावी लागते, अन अशी वेळ जेव्हा येते ना, त्यावेळी कधी-कधी विश्वासच बसत नाही. आपण असेही वागू शकतो-हे पचनी पडायला वेळ द्यावा लागतो. अशा अचानक घडणाऱ्या गोष्टींमुळे आपल्यात अनेक बदल होत असतात.

हरवलेल्या अन पुन्हा कधीही न सापडणाऱ्या काही स्वप्नांना आणि नात्यांना मन सतत आठवत असतं. माहित असतं कि आता काहीही परतून येणार नाहीये. या व्यवहारी आणि मायावी जगात देव (पावित्र्य) आणि देवत्व सांभाळण जितकं कठीण आहे, त्याहून अशा आठवणीतल्या नात्यांना (मन हलकं कराव म्हणून) उजाळा देताना योग्य व्यक्ती भेटणं महाकठीण आहे. देवतुल्य गुरुजन, जीवाला जीव देणारे मित्र-मैत्रिणी, गावाकडे शाळेत असताना आजी-आजोबांचा जिव्हाळा....... 
ह्या आठवणी जीवन जगताना खूप प्रेरणा देतात. मनाला एक अकल्पित शक्ती आणि स्फूर्ती देत असतात. काही अपूर्ण राहिलेली स्वप्नं काही काळ मनाला छळणारचं!!! पण म्हणतातना- काळ हा सगळ्या जखमांवरील जालिम उपाय आहे. जसा-जसा काळ पुढे सरकतो, तसं अर्धवट छळणाऱ्या सुरवंठरूपी स्वनांचं बळ देणाऱ्या (विविध रंगाच्या छटा असणाऱ्या) फुलपाखरांरूपी आठवणींमध्ये रुपांतर होत असतं!! अर्धवट स्वप्नांचा असा होणारा प्रवास निश्चितच फार सुखकर असा नसतो...पण तो तसाच व्हायला हवा. वि. स. खांडेकरांच्या "अमृतवेल" कादंबरीतील तो परिच्छेद हाच समर्पक उपदेश देणारा आहे.
-
राहुल



बुधवार, २३ एप्रिल, २०१४

निवडक व.पु.

एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा, एकांताची माझी व्याख्या फार वेगळी आहे. परिसराचं मौन म्हणजे एकांत आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण. तेव्हा तू एकांतात जा, मनसोक्त रड. जमिनीला अश्रू हवे असतात. मातीचं देणं चुकवलं की हलकी होशील. वर चढशील, आकाशाजवळ पोहोचशील. असचं कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम, ’तुका आकशाएवढाअसं लिहून गेला असेल.’

तू भ्रमत आहासी वाया................

रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला धैर्य लागतं.’

ये, पण नुसती पडून रहा. माझ्याजवळ येऊन रडायला लागलीस की मी सांत्वनासाठी शब्द शोधणार. सांत्वनासाठी आजवर जगात कुणालाही शब्द सापडले नसतील. सांत्वन म्हणजे दुःखाच मूल. मूल आईपेक्षा मोठं कसं होईल? मूल मोठं व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते. म्हणून,समजूत घालणारं कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात. हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही. तेव्हा तू जा. बाहेर पड. एकांत शोध. तिथं तू तुझी डिग्री विसरशील. समजुतीला कुणी येणार नाही. शांत होण्याचे इशारे आतूनच उमटतील, मग आपोआप शांत होशील.’


"प्रियकर परिपूर्ण असतो. नवर्याला मर्यादा असतात" कारणसंसार हा व्यवहार आहे. प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं. मीउरत नाही. म्हणून संघर्ष नसतो. संसारात तसं होत नाही.’

प्रेम म्हणजे मरण असतं. मीहा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही. मरणात तेच होतं. ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे, तोच खरं प्रेम करु शकतो.’

सुर्यप्रकाश वाढू लागला की दंवबिंदू आपोआप नाहीसे होतात.’

‘अंधाऱ्या वाटेवर क्षणभर विजेचा प्रकाश पडतो. वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतो. मग काही काळ चालणं अवघड जातं. म्हणून सांगतो. गुरू शोधू नकोस. चालणं, ठेचकाळणं, रक्तबंबाळ होणं, एकाकी पडणं, दरीत कोसळणं, हे सगळ घडू दे. नियती, प्रारब्ध हे अड्थळे मानू नकोस. ते सौभाग्य आहे. आगीतून जा. कचरा जळून जाईल. सोनं उरेल. प्रेमपुर्तीत साफ़ल्याची शंका असते, प्रेमभंगातलं वैफ़ल्य नवी पायवाट शोधायला लावते, स्वतःच्या मालकीची.

अनुभव घेणारा प्रत्येकजण वेगळा असतो.

आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्वं दुसर्याला थेअरी वाटते.’

कबुतराला गरूडाचे पंख लावता येत नाहीत. कदाचित लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही.’

रडणं भोगायचं असतं. हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी,दुःखाला घर हवं. कारणही हवं.’

व्यवहाराला गंध नसतो. स्पर्श नसतो. सूर नसतो. गोंगाट असतो. रूचीच नसते मग अभिरूचीची बातच दूर.’

प्लास्टीक़च्या फ़ुलांना फक्त धुळीचा शाप. सर्फनं धुतली की झालं. पण नळाखाली धरल्यावर ती शहारून येत नाहीत. जन्म-मरणाचाच फ़ेरा नसेल, तर शहारे-रोमांच, आसक्ती, विरह-मिलन, भय, सगळ्यातूनच मुक्ती. जिवंत फ़ुलं स्वाभिमानी असतात. धुळीचा थर जमण्याआधीच मरण पत्करतात.
निर्माल्य म्हणजे हौतात्म्य.
धुळिचा पेहराव म्हणजे अमरता.’

लेखक : .पु. काळे
  —


विनोद- Jokes

जीवशास्त्राचे शिक्षक - जर समजा एखाद्या मुलीला अस्थमाचा attack आला तर तिला खूप वेळ आपल्या ओठांनी श्वास द्या.
झंप्या - ते ठीक आहे..........पण असं काय करायचं की ज्याने मुलीला अस्थमाचा attack येईल.?.........

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

👺रावण : सिगरेट आहे का रे?
कुंभकर्ण : नाही... संपल्या.
बिभिषण : अरे नाही काय म्हणतोस
एक पाकीट
आहे ना अजून!
...
कुंभकर्ण : तु जरा शांत बस ना!
त्या साल्याला दहा तोंडे आहेत....
एका मिनिटात
पाकीट संपवेल...😜😜😜😜

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰



औरंगजेब 😡- सेनापती.... ईतकं
शोधुनही शिवाजी का सापडत
नाहीये ?

सेनापती 😋-  आपण मुघल आहोत ... गुगल नाही !  😆

शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४

भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची- मंगेश पाडगांवकर

भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

निवडक व.पु. काळे

परिस्थिती बदलणारे आपण कोण ? गृहीत धरायची शक्ती एवढ्यासाठीच वाढवायची, त्यामुळे ’मन’ नावाची एक दुर्मिळ वस्तु सुरक्षित राहते. टवटवीत राहते. मन कोसळलं की माणूस कोसळला. मन शाबूत ठेवलं की आयुष्य पैलथडीला हसत खेळत नेता येतं. माणूस प्रथम मनाने खचतो, तसं झालं की प्रवाह संथ असतानाही त्यांच्या होड्या उलटतात. आपण फ़क्त एवढंच करू शकतो की आपण आपला शब्द फ़िरवल्यामुळे दुस-याची होडी बुडणार नाही ना एवढीच काळजी घ्यायची, म्हणजे घेऊ शकतो.

पुरुषाचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते आणि त्याला मुल झालं म्हणजे बायको.................

"नाही म्हणायचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं. ते आपण उपभोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण ’ नाही ’ का म्हणत नाही? न पटणाऱ्या, न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो? आपणच दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करू देतो. जेव्हा आपल्याला त्याचा वीट येतो तेव्हा उशीर झालेला असतो आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते, तेव्हा इतरांचा इंटरेस्ट संपलेला असतो."

एका क्षणामधे पत्नीची आई होते..... नवर्‍याने त्यानंतर पिता व्हाव ही पत्नीची अपेक्षा असते.पण तसं घडत नाही.
ह्याच कारण दिवस गेल्यापासून दिवस पुर्ण होईपर्यंत पत्नीने मातृत्वाचा एक छोटा कोर्स केलेला असतो... एकच विद्यार्थी असलेला वर्ग तिने नऊ महिने सांभाळलेला असतो. आई आणि मुल शाळेतच असतात आणि पुरुष शाळासोडुन अन्यत्र असतो . म्हणुनच त्याला पिता व्हायला वेळ लागतो.
त्यात शाळेला कायमच कंटाळलेला नवरा वाट्याला आला तर संसारामधे तो बिनखात्याचा मंत्री असतो..............

चैतन्याने बहरलेली फुलं आपण तोडतो आणि अचेतन मुर्तीवर वाहतो. आपल्याला सरळ सरळ चैतन्याची पूजा करताच येत नाही. स्वैराचार आणि स्वच्छंद यातला फरक समजला म्हणजे प्रेम ह्या शब्दाचाही अर्थ कळतो..

आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस ’माणूस’ राहत नाही, तर परतून येतं ते चैतन्य..

जगायचं -- आणि तेही जनावरापेक्षा वेगळं जगायचं --- म्हटलं की भूतकाळही हवा आणि स्वप्नंही हवीत. केवळ कटू आठवणींनीच भूतकाळ भरलेला असला , तरी तो हवा , त्याच्या आठवणीही हव्यात. भोगून पार केलेली संकटं आणि यातना , त्यांच्या उच्चाराबरोबरच वेगळं सामर्थ्य देतात. त्याची नशा माणसाला मस्त बनवते , मस्तवाल बनवत नाही.

...........,जीवनावर , जगावर,जगण्यावर असं प्रेम केलं म्हणजे सगळं निर्भय होतं.उपमा द्यायचीच झाली तर मी विजेचीच उपमा देईन .पृथ्वीची ओढ निर्माण झाली रे झाली कि ती आकाशाचा त्याग करते ,पृथ्वीवर दगड होवून पडते ,पण पडण्यापासून स्वताला सावरत नाही आणि तेजाचाही त्याग करत नाही.प्रेम करताना माणसानंही असं तुटून प्रेम करावं.

व पु म्हणायचे "तुम्ही नुसते गुणी असून चालत नाही.
ते गुण खळबळ न करता मान्य करणारा समाज तुमच्या भोवती जमणं याला महत्व आहे.गुणी माणसाचं नाणं वाजणंच कठीण होवून बसलंय. "

'राणी, प्रारंभासाठी सगुण साकाराची ओढ ही महत्वाची बाब आहे; पण कितीही देखणेपणा - देखणेपणा म्हटलं, तरी त्याला सगुण साकाराच्याच मर्यादा छळतात. नावीन्य आणि परिचय ह्या दोन अवस्था एकमेकांच्या वैरिनी. मोर अधूनमधूनच, केव्हातरी दिसतो, म्हणून जास्त आवडतो. सातत्य टिकतं, ते विचार देखणे वाटतात, म्हणून; वृत्ती जूळतात, म्हणून मैत्रीची वीण जास्त पक्की होते, ती वेदना आणि संवेदना एकच होतात; म्हणून नाविण्याची ओढ ही एक सहजावस्था आहे. कोणतीही देखणी वस्तू तत्क्षणी आवडते. दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली, तर सगुण साकारापलीकडचं सौदर्य दिसू लागतयं, अनुभवायला मिळतयं अस समजावं. पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते, हा बायकांचा चुकीचा समज आहे. आकर्षण आणि प्रेम ह्या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत.

"जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपुर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहीली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही."

सगळी उत्तरं आपल्याजवळच असतात.समस्या आपली आणि त्याचं उत्तरं मात्र इतरत्र असे घडत नाही.
उत्तराची मागची बाजू म्हणजे समस्या.आपण फक्त आपली बघण्याची दिशा बदलायची.स्वतःकडेच नीट पाहायचं.
'पिंडी ते ब्रह्मांडी' असं म्हणतात ते सत्य आहे

एखाद्या प्रश्नाचं उत्तरं द्यायची वेळ एकदाच येते. तो क्षण निसटू द्यायचा नसतो.

'इट जस्ट हँपन्स' म्हणत पुढच्याच क्षणी जी माणसं कामाला लागतात , ती जास्त जगतात.अश्रू गाळण्यात आपलं वीस टक्के आयुष्य वाया जात असेल.काही माणसांचं तितके टक्के आयुष्य इतरांच्या नावाने बोटं मोडण्यात जातं.
पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त, कृतघ्न, वास्तववादी, की हे सगळे समर्थांचे शिष्य?
'मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे.'
अकरा शब्दांत समर्थांनी सगळं आयुष्य उकलुन दाखवलं.

गादी-उशीशिवाय झोपणं तर सोडाच, पण नेहमीची उशी जरी वाटणीला आली नाही तरी आपली मिजास जाते. दिवसातून दहा वेळा जप करतो. डोळ्याला डोळा नाही हो रात्रभर. रात्र वैरीण नसते. उशी तर नसतेच नसते. सवय वैरीण. आणि तिला जन्म देणारे आपणच.

ओळख वेगळी नि ओळखणं वेगळं....
ओळखीला आपण कधीतरी ओळख समजतो....
पण जवळची व्यक्ती कधीतरी अपेक्षेपेक्षा वेगळी वागते,
तेव्हा "ओळख" आणि "ओळखणं" यामधला खरा फरक समजतो.....
.
.
.
हातभर अंतरावर असलेली आणि जवळची वाटणारी व्यक्ती सुद्धा आपल्यापासून कितीतरी मैलो दूर आहे याची तेव्हा जाणीव होते


नाणी नेहेमी आवाज करतात पण नोटा आवाज करत नाहीत
म्हणून जेंव्हा तुमची किंमत वाढते तेंव्हा तुम्ही शांत राहिलं पाहिजे

लपून राहणं हा प्रकाशाचा गुणधर्म नाही.

रामाला दूर नेण्यापुरताच सुवर्णमृगाचा जन्म, सीतेला काय कमी होते ?
संपूर्ण आयुष्य गहाण टाकायला लावणारा मोहाचा क्षण एवढाच असतो ...

'आपल कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की
समजावं आपला उत्कर्ष होतोय.'

काळ हा माणसाचा शत्रू नव्हे . तो सर्वात जवळचा मित्र आहे.मुख्य म्हणजे तो गतिमान असल्याने नित्य टवटवीत , ताजा असतो.एखाद्या दिवसाची तो तुम्हाला वाट पाहायला लावतो ते तुमचा अंत पाहायला म्हणून नव्हे, तर त्या दिवसाला तुम्ही कडकडून , तीव्रतेने भिडावं म्हणून !
जेवढी प्रतीक्षा मोठी , तेवढाच पूर्तीचा क्षण ज्वलंत , ताजा , उत्कट !

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०१४

सुरेश भट- कुठलेच फूल आता मजला पसंत नाही

कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही

हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला
समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही

जमवूनही तुझ्याशी माझेतुझे जमेना
इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही

मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही

थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणार्‍या कसलीच खंत नाही

मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे?
दुनिये, अता रडाया मजला उसंत नाही

दारात दु:खितांच्या मी शब्द मागणारा
(तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही)

मी रंग पाहिला ह्या मुर्दाड मैफलीचा..
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!


– एल्गार, सुरेश भट

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

Inspirational....


Awesome Answers In IAS Examination

Q. How can you drop a raw egg onto a concrete floor without cracking it?
A. Concrete floors are very hard to crack! (UPSC Topper)

Q. If it took eight men ten hours to build a wall, how long would it take four men to build it?
A. No time at all it is already built. (UPSC 23rd Rank Opted for IFS)

Q. If you had three apples and four oranges in one hand and four apples and three oranges in the other hand, what would you have?
A. Very large hands. (Good one) (UPSC 11 Rank Opted for IPS)

Q. How can you lift an elephant with one hand?
A. you will never find an elephant with one hand. (UPSC Rank 14 Opted for IES)

Q. How can a man go eight days without sleep?
A. No Probs, He sleeps at night. (UPSC IAS Rank 98)

Q. If you throw a red stone into the blue sea what it will become?
A. It will Wet or Sink as simple as that. (UPSC IAS Rank 2)

Q. What looks like half apple ?
A: The other half. (UPSC - IAS Topper )

Q. What can you never eat for breakfast?
A: Dinner.

Q. Bay of Bengal is in which state?
A: Liquid (UPSC 33 Rank)

Interviewer said "I shall either ask you ten easy questions or one really difficult question. Think well before you make up your mind!" The boy thought for a while and said, "my choice is one really difficult question." "Well, good luck to you, you have made your own choice! Now tell me this.
"What comes first, Day or Night?"
The boy was jolted into reality as his admission depends on the correctness of his answer, but he thought for a while and said, "It's the DAY sir!"
"How" the interviewer asked.
"Sorry sir, you promised me that you will not ask me a SECOND difficult question!"
He was selected for IIM!

Technical Skill is the mastery of complexity, while Creativity is the master of presence of mind.
This is a famous paper written for an Oxford philosophy exam, normally requiring an eight page essay answer and expected to be backed up with source material, quotes and analytical reasoning. This guy wrote the below answer and topped the exam!

OXFORD EXAMINATION BOARD 1987, ESSAY QUESTION
Question: What is courage? (50 Marks)
Answer (After 7 blank pages, at the end of the last page…): This is courage

पसायदान - Universal Prayer

मराठी माणसात किंबहुना सर्व भारतीय लोकांमध्ये असणारा स्वभाव गुणधर्म म्हणजे- मनाची श्रीमंती! सगळ्या जगाचे कल्याण व्हावं, संपूर्ण विश्व हेच माझे घर आहे, ही शिकवण आपणाला परंपरागत मिळालेली आहे. याचा सारांश संत ज्ञानेश्वरांनी  पसायदानामध्ये मांडलेला आहे. त्याचीच एक उजळणी आज पुन्हा करावीशी वाटते.

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

पसायदानाचा अर्थ (प्रचलित मराठी आणि इंग्रजीत) 



रविवार, १४ जुलै, २०१३